





































या मोहिमेअंतर्गत शिबिरामध्ये महिलांचा, किशोरवयीन मुलांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सहमाग दिसून आला. तसेच शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स व ग्रामस्थांमध्येही मानसिकआरोग्याबद्दल सकारात्मक जागरूकता निर्माण झाली आहे.
"मनस्वी" शिबिरांमुळे मानसिक आरोग्य या महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर स्थानिक पातळीवर विचारमंथन सुरू झाले असून,यामुळे समाजात मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होत आहे.
"मनस्वी अभियान" कालावधीमध्ये एकुण १०५ आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये ६८५० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यामधील १५१ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भिय केले आहे.
















